बुधवार, ३० जानेवारी, २०१९

‘मूकनायका’ची शताब्दी





(डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले, त्याला यंदा शंभर वर्षे होताहेत. या निमित्ताने या वृत्तपत्राची निर्मिती आणि बाबासाहेबांच्या त्यामागील प्रेरणा यांवर प्रकाश टाकणारा लेख आज दि. ३० जानेवारी २०१९ रोजी दै. सकाळच्या कोल्हापूर आवृत्तीमध्ये प्रकाशित झाला आहे. तो सकाळच्या सौजन्याने माझ्या ब्लॉगवाचकांसाठी पुनर्मुद्रित करीत आहे.- आलोक जत्राटकर)


शनिवार, दि. ३१ जानेवारी १९२० हा दिवस भारतीय पत्रकारितेच्या दृष्टीने अनेकार्थांनी असाधारण स्वरुपाचा आहे. कारण या दिवशी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर या विलायतेहून उच्चविद्याविभूषित होऊन आलेल्या आणि हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या जोखडाखाली पिचलेल्या समाजाच्या उत्थानाच्या प्रेरणेने भारावलेल्या तरुणाने अत्यंत विचारपूर्वक या दिवशी मूकनायक या पाक्षिकाच्या प्रकाशनाला सुरवात केली.

बाबासाहेबांच्या आधी गोपाळबाबा वलंगकर (विटाळविध्वंसन), शिवराम जानबा कांबळे (सोमवंशीय मित्र), किसन फागू बंदसोडे (विटाळविध्वंसक) आणि गणेश आकाजी गवई (बहिष्कृत भारत) आदींनी स्वतःच्या पत्रांबरोबरच तत्कालीन सत्यशोधक वृत्तपत्रांतूनही अस्पृश्यता निवारणविषयक लेख लिहून त्यांनी आपले प्रबोधनाचे कार्य चालविले होते. त्यामुळे मूकनायक हे अस्पृश्य, दलित बांधवांसाठी निघालेले पहिलेच पत्र होते, असे नव्हे; पण, अस्पृश्यता निवारणाच्या लढ्यामध्ये सामाजिक, धार्मिक मुद्यांच्या पलिकडे जाऊन त्यांच्यात राजकीय हक्कांच्या जाणीवेचे वारे फुंकणारे आणि अस्पृश्यतेच्या प्रश्नाची अत्यंत मूलभूत शास्त्रशुद्ध मांडणी करणारे पत्र म्हणून मूकनायक हे निश्चितपणाने अत्यंत महत्त्वाचे आहे. 

बडोदा संस्थानची शिष्यवृत्ती थांबल्यामुळे विद्याभ्यास अर्धवट सोडून विलायतेहून परतलेल्या बाबासाहेबांना उच्चविद्याविभूषित असूनही बडोद्यातील नोकरीत जातीयवादाचा त्रास झाला. त्यामुळे ती नोकरी सोडून ते मुंबईतल्या सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नोकरी करून काही पुंजी साठवून पुन्हा विलायतेला जाऊन अपूर्ण अभ्यास पूर्ण करायचा, त्यांचा संकल्प होता. त्यामुळे सार्वजनिक कार्यात लक्ष घालण्याची त्यांची भूमिका नव्हती. तथापि, तत्कालीन राजकीय घडामोडीच अशा काही गतिमान झाल्या की, त्यात त्यांना पुढाकार घेणे भाग पडले. २० ऑगस्ट १९१७ रोजी माँटेग्यू सुधारणांची घोषणा झाली. त्या अंमलात आणण्यासाठी साऊथबरो कमिशनच्या वतीने येथील लोकांच्या साक्षी घेण्याचे काम सुरू होते. कमिशनसमोर अस्पृश्यांची बाजू स्वतंत्रपणे मांडणे आंबेडकरांना आवश्यक वाटले. म्हणून सरकारी नोकरीत असतानाही पत्रव्यवहार करून त्यांनी कमिशनसमोर साक्ष देण्यासाठी स्वतःची निवड करून घेतली आणि अत्यंत हिरीरीने अस्पृश्यांची कैफियत कमिशनसमोर मांडली.

या वेळी बाबासाहेबांना जाणीव झाली की, अस्पृश्यांची कैफियत नीटपणे मांडली गेली नाही, तर त्यांना राजकीय हक्क प्राप्त होणे दुष्कर आहे. त्यासाठी त्यांची बाजू सातत्याने मांडणारे साधन असणे जरुरीचे आहे. महाराष्ट्रात त्यावेळी पत्रे खूप होती, पण अस्पृश्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी पत्रे नाहीत, असा त्यांचा अनुभव होता. वस्तुस्थिती तशी होतीच. अस्पृश्यांच्या हिताहिताची चर्चा करणाऱ्या वृत्तपत्राशिवाय अस्पृश्यांचे भवितव्य घडविणे अशक्य आहे, असे त्यांच्या मनाने घेतले. आणि त्यातूनच, ३१ जानेवारी १९२० रोजी 'मूकनायक' पाक्षिकाचा जन्म झाला.

बाबासाहेबांचा वृत्तपत्र सुरू करण्याचा मनोदय प्रत्यक्षात येऊ शकला, तो कोल्हापूर संस्थानचे सहृदयी राजे शाहू महाराज यांच्यामुळेच. महाराजांच्या चळवळीतील दत्तोबा संतराम पवार यांच्याकडून महाराजांना आंबेडकरांविषयी आणि त्यांच्या वृत्तपत्र काढण्याच्या भूमिकेविषयी समजले. त्यांना ही कल्पना पसंत पडली आणि त्यांनी त्यासाठी लगोलग अडीच हजार रुपयांचा भरघोस निधी दिला. तो हाती पडताच बाबासाहेबांनीमूकनायक सुरू केले. हजारो वर्षे चातुर्वण्याच्या, गुलामगिरीच्या ओझ्याखाली दबलेल्या, शोषित, वंचित, अस्पृश्य अशा ज्यांना या सामाजिक व्यवस्थेत अन्यायाविरुद्ध तोंडून ब्र सुद्धा काढण्याची परवानगी नव्हती, अशा अस्वस्थ समाजमनाचा हुंकार, आवाज म्हणजे मूकनायक. दबलेल्या समाजात अन्यायाविरुद्ध गर्जना करण्याचा आत्मविश्वास पेरणारा असा हा मूकनायक होता. सरकारी नोकरीत असल्याने संपादक म्हणून बाबासाहेबांनी वऱ्हाडातील अंडरग्रॅज्युएट तरुण पांडुरंग नंदुराम भटकर यांची नियुक्ती केली. पत्रावर बाबासाहेबांचे नाव नसले तरी त्याची प्रेरक शक्ती तेच आहेत, हे साऱ्यांना माहीत होते. मूकनायकचे पहिले चौदा अग्रलेख बाबासाहेबांचे होते. बाबासाहेबांनी स्वतःला इंग्रजीत विचार करण्याची इतकी सवय लावून घेतली होती की, आपल्या लेखनाचा मसुदा ते प्रथम इंग्रजीत तयार करीत आणि नंतर त्याचे स्वतःच मराठीत रुपांतर करीत, तेही अत्यंत दर्जेदार स्वरुपात. आपल्या पत्राला साजेशी बिरुदावली तुकारामांच्या अभंगांतून त्यांनी शोधली होती-
काय करू आता धरुनिया भीड।
निःशंक हे तोंड वाजविले।।
नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण।
सार्थक लाजून हित नव्हे।।

बाबासाहेबांचा वृत्तपत्र काढण्याचा हेतूच स्पष्टपणे उद्घोषित करणाऱ्या या ओळी आहेत. तरीही वृत्तपत्र माध्यमाचे आपल्या चळवळीतील महत्त्व सांगताना पहिल्याच अंकातील मनोगत या अग्रलेखात बाबासाहेब स्पष्ट करतात की, "बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायांवर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमी नाही; परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या पत्रांकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यांतील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातींचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातींच्या हिताची पर्वा त्यांना नसते. इतकेच नव्हे, तर केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही प्रलाप त्यातून निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा एवढाच इशारा आहे की, कोणतीही एखादी जात अवनत झाली, तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींस बसल्याशिवाय राहणार नाही... एका जातीचे नुकसान केल्याने प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातींचेही नुकसान होणार, यात शंका नाही. म्हणून स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करून आपले हित करायचे पढतमूर्खाचे लक्षण शिकू नये. हा बुद्धिवाद ज्यांना कबूल अशी वर्तमानपत्रे निघाली आहेत, हे सुदैवच म्हणायचे. या पत्रांतून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार होते; परंतु ब्राह्मणेतर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्नांचा ज्यात खल होतो, त्यात बहिष्कृतांच्या प्रश्नांचा सांगोपांग ऊहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही, हेही पण उघडच आहे. त्यांच्या अतीबिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे, हे कोणीही कबूल करील. ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे." असे बाबासाहेबांनी स्पष्ट केले होते.

'मूकनायक' सुरू केल्यानंतरही बाबासाहेबांची इंग्लंडला विद्याभ्यास पूर्ण करायला जाण्याची धडपड सुरू होतीच. त्याची व्यवस्था होताच १९२०च्या जुलैमध्ये ते लंडनला रवाना झाले. व्यवस्थापक मंडळाच्या सल्ल्याने पत्र चालवावे, असे ठरले. मात्र, भटकरांकडून अंकाचे काम वेळेत होईनासे झाले म्हणून व्यवस्थापक मंडळाने संपादकीय सूत्रे ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप यांच्याकडे दिली. मात्र, घोलपांनाही ही जबाबदारी व्यवस्थित पेलता न आल्यामुळे अखेर ८ एप्रिल १९२३ रोजी 'मूकनायक' बंद पडले. तथापि, अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी अस्पृश्यांनी चालविलेल्या वृत्तपत्रांत 'मूकनायक'ला विशेष स्थान आहे. डॉ. आंबेडकरांच्या राजकीय नेतृत्वाच्या अगदी प्रारंभ काळातील एक उपक्रम म्हणूनही या पत्राला विशेष महत्त्व आहे. अस्पृश्यांच्या चळवळीला बाबासाहेबांसारख्या गाढ्या विद्वानाचे नेतृत्व लाभल्याने चळवळीला जे नवे वळण मिळाले आणि त्यातून जो इतिहास घडला, त्यातले हे पहिले महत्त्वाचे पाऊल होते. हिंदुस्थानच्या राजकारणात बहुजनांच्या पाठोपाठ अस्पृश्य वर्गाचीही उपेक्षा करून चालणार नाही, त्या वर्गात नवी जागृती येत आहे, तिची दखल सर्वांनी घेणे आवश्यक होते. 'मूकनायक' पत्र मूक जनांचे प्रतिनिधित्व करीत असले तरी त्याच्या त्या वेळी अबोल वाटणाऱ्या बाह्य स्वरुपामागे केवढी तरी सुप्त शक्ती वास करीत आहे, याची जाणीव व इशारा देणारे असे हे पत्र होते. अस्पृश्यांत अस्मिता जागविण्याचे 'मूकनायक'ने अल्पावधीत केलेले कार्य लोकजीवन घडविणारे होते. प्रबोधनाचा तो प्रभावी आविष्कार होता. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या लोककल्याणकारी, सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक पत्रकारितेचा तो आरंभबिंदू आहे. त्यानंतरच्या कालखंडात बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत अशा वृत्तपत्रांचा प्रपंच थाटला. त्यांच्या या साऱ्या वृत्तपत्रीय कारकीर्दीमध्ये मूकनायकाचे स्थान हे अत्यंत मूलभूत आणि महत्त्वाचे आहे. म्हणूनच त्याचे मोल आज शंभर वर्षांनंतरही कायम आहे.

सोमवार, २८ जानेवारी, २०१९

The Artiste whose Creation printed in Crores, Literally!

(I have written this article originally for "Chanakya", the mouth journal of Public Relations Council of India (PRCI). It is e-published on PRCI's mouth-blog http://prapport.blogspot.com . Herewith sharing the article with the kind courtesy of PRapport and our guide, Editor Mr. B.N. Kumar, Mumbai. Hope, my blog readers will love it.- Alok Jatratkar)


He is simple… He is humble… He is noble… And so are his creations…
When you meet Anant Khasbardar or visit his office, only one thing gets on your mind and that is pure simplicity. Even being in the profession of advertising, PR and event management for so many years, Khasbardar is not driven away with attitude, but has got connected more and more with the society. And that is the inspiration behind the ideas for his campaigns and creations.
So far, Anant Khasbardar has created many logos, designs and campaigns for many agencies and firms. But, he is in limelight for his worthy design of ‘Swachha Bharat’ i.e. Clean India mission. Yes, the transparent spectacles of Mahatma Gandhi and the devnagari letters ‘स्वच्छ भारत on each of the glass and the pair connected by the Indian Tricolor flag, is the creation of Anant Khasbardar, the artiste from Kolhapur (Maharashtra). And, after demonetisation, every new currency printed by Reserve Bank of India is depicted with this logo on each note, may it would have been of Rs. 2000, Rs. 500, Rs. 200 or Rs. 50.

Anant Khasbardar designed this logo within 15 minutes time, but the thought process behind the design is much more prolonged and suggestive. Mahatma Gandhi’s chashma (spectacles) is a symbol of his philosophy of cleanliness, not only physical but also of mind and soul. So it is crystal clear that it carries the flavour of Indian philosophy. That is the simplicity of idea which clicked the judges and he won the prize for logo designing. And, now its printing on the Indian currency is an honour of an artiste and his art. It’s of damn sure that no any other creation might have been printed as that of Khasbardar’s creation of Swachha Bharat logo, that means literally in the volume of crores. Yes, he is happy for that but not allowed his feet to leave soil. He’s continued his work with passion and commitment forward.
 Anant Khasbardar runs advertising, PR and event firm named “Nirmiti Graphics” from Kolhapur with a branch in Mumbai. Nirmiti is a Marathi word, itself means Creation and “Creation has no bounds” is a motto of this firm. And, its every creation is an example of creativity and simplicity at the same time, may it be the logo of National Digital Literacy Mission, may it be of 12th South Asian Games-2016 or may the variety of campaigns designed for many political parties or prominent political leaders, Prime Minister Narendra Modi, being one of the beneficiaries.
Khasbardar has a very vast range of creations and campaigns to his credit. Along with the regular advertisements for print media, he has created many calendar designs, brochures for many firms, designed construction expos and many events. Nirmiti’s website www.nirmitiindia.com is itself a very nice example of simply creativity.
About his journey in this field of creativity, Anant Khasbardar, in his unique style, tells, thanks to our unique and versatile Indian culture and tradition full of festivals, colours, various forms of symbols and rituals, from which my every art, design and creation is inspired. He feels that creativity is God gifted and is unending process of self searching within and out, which takes you to the world of amazing ideas. Tiny pictures, symbols have huge power of communication, rhythmic lyrics are empowered to make you dance, and aesthetics within architect is capable to change one’s mood or entire lifestyle. That is the power of creativity which nature and culture altogether bless us.
Khasbardar doesn’t keep the credit with himself only. He emphasizes that his partner Shirish Khandekar and entire team of Nirmiti are the partners of his efforts to change the taste of people with designs, forms and simple words along with effective graphical presentation. He’s hopeful that his blending of verbal and non-verbal communication into the creative art will upheld the society’s trust and liking in Indian culture and environment. After all, it is a long distant journey towards holy peace of mind which I wish to travel through my creations, he solemnly declares.

Contact Details:
Anant Khasbardar, Nirmiti Graphics, 42, Sanmitra Society, Rajarampuri, Kolhapur-416008
Email- nirmiti231@yahoo.co.in,  Mob.: 9822321442

(The original article is published on http://prapport.blogspot.com/2018/11/expert-speak-communication-for.html)

गुरुवार, १७ जानेवारी, २०१९

"साहित्याने मानवी मूल्यांसाठी आग्रही असावे!"



(निपाणी येथे येत्या १९- २० जानेवारी २०१९ रोजी निपाणी भाग मराठी साहित्य संमेलन भरत आहे. या निमित्ताने दै. पुढारीच्या बेळगाव आवृत्तीमध्ये या संमेलनाकडून असलेल्या अपेक्षांविषयी मनोगत प्रसिद्ध झाले आहे. हा सविस्तर लेख माझ्या ब्लॉग वाचकांसाठी येथे पुनर्प्रकाशित करीत आहे.)


निपाणी येथे मराठी साहित्य संमेलन भरते आहे, याचा आनंद मोठा आहे. सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्याही निपाणी अतिशय कृतीशील आणि चळवळे ठिकाण आहे. येथे साहित्य संमेलन या शीर्षकाखाली साहित्य आणि साहित्यिकांचा मेळा प्रथमच भरत असला तरी, येथील महाविद्यालये आणि इतर क्रियाशील संस्था यांच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून येथे मराठीतल्या अनेक महत्त्वाच्या साहित्यिकांचे येणे झालेले आहे. आता त्याला साहित्य संमेलनाचे अधिष्ठान लाभते आहे, इतकेच!
या पार्श्वभूमीवर, या साहित्य संमेलनाकडून काही अपेक्षा असणे स्वाभाविक आहे; त्याच वेळी या सुरवातीच्या क्षणी अपेक्षांचा डोंगर उभा करणेही इष्ट नाही. काही माफक पण मूलभूत अपेक्षांची पूर्ती मात्र या संमेलनातून होणे आवश्यक आहे.
निपाणीमध्ये मराठी साहित्य संमेलन होत असताना या शहराचे भौगोलिक आणि भाषिक स्थानही महत्त्वाचे ठरते. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या लढ्यात या शहराचे योगदान आणि महत्त्व मोठे आहे. सीमाभागातील पहिले शहर म्हणून मराठीच्या अस्मितेचा झेंडा मोठ्या डौलाने येथे फडकविला जातो. मराठी भाषा आणि मराठी भाषिक यांच्या मुस्कटदाबीविरोधात वाचा इथेच फुटते. त्यामुळे मराठी भाषा हा इथे अभिमानाने मिरविण्याचा विषय आहे. त्याचवेळी स्थानिक मराठी बोलीभाषेवर कन्नड भाषेचा प्रभाव अगदी जाणवण्याइतपत ठळक आहे. ही भाषा कधी आपल्याला महादेव मोरेंच्या कथांतून; तर कधी राजन गवस यांच्या कादंबऱ्यांतून आपल्याला भेटत राहते. म्हणजे मराठीचा झेंडा उंचावत असताना त्यावरील कन्नडचा प्रभाव आपल्याला सहजी नाकारता येत नाही, येणार नाही. इथल्या मराठीचे नेमके हेच वैशिष्ट्य घेऊन आपल्याला स्वतःच्या साहित्य निर्मितीच्या प्रेरणा शोधल्या पाहिजेत आणि मांडल्या पाहिजेत. त्यासाठी अभिजात प्रमाण मराठीचा आग्रह प्रसंगी झुगारून आपल्या बोलीभाषेतून व्यक्त होण्यासाठी नवलेखक, साहित्यिकांना प्रोत्साहन द्यायला हवे. अशा साहित्याचा आणि साहित्यिकांचा सहभाग वाढविणे आणि त्यांचा तरुण पिढीशी संवाद घडवून आणणे, अत्यावश्यक आहे. जेणे करून मराठी भाषेच्या संदर्भातील न्यूनत्वाची भावना लोप पावून नवलेखक आपल्या भाषेतून सहजगत्या व्यक्त होण्यास पुढे सरसावतील आणि त्यांच्याकडून अस्सल, सकस साहित्यकृती निर्माण होतील.
महाराष्ट्रात आणि परिसरातील मराठी भाषिक टप्प्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाव्यतिरिक्त सुमारे अडीचशेहून अधिक लहानमोठी साहित्य संमेलने दरवर्षी भरतात. या साहित्य संमेलनांची संख्या वर्षागणिक वाढतेच आहे. सीमाभागातही कडोली, येळ्ळूर अशा अनेक ठिकाणी साहित्य संमेलने भरतात आणि मराठी भाषेच्या अस्मितेचा तिथला आग्रह हा महाराष्ट्रातील कोणत्याही अन्य साहित्य संमेलनाच्या तुलनेत अधिक आणि आक्रमक असतो. कर्नाटक शासनाच्या मराठीविरोधी धोरणांचा हा प्रतिरोध अभिव्यक्त होणे स्वाभाविक आहे. त्याचे प्रतिबिंब निपाणीच्या संमेलनातही उमटणे स्वाभाविक आहे. तथापि, निपाणीने या सीमाप्रश्नाच्या लढ्याला रसद पुरविण्याबरोबरच दिशा देण्याचे काम केले आहे. ते साहित्यिक संदर्भातही करावे लागणार आहे. सीमाप्रश्नाचा लढा भौगोलिकतेबरोबरच भावनिकही आहे, हे मान्य करूनही आणि मराठी भाषिक अस्मिता जपण्याची बाब अधोरेखित करूनही; या संमेलनाने मराठी आणि कन्नड भाषेमधील संवादाचा पूल म्हणूनही काम करावे, अशी माझी अपेक्षा आहे. कर्नाटकातील शिवराम कारंथ, गिरीष कर्नाड, श्री, कुवेंपु (के.व्ही. पुटप्पा) अशा महान कन्नड साहित्यिकांशी माझा परिचय झाला, तो उमा कुलकर्णी यांच्यामुळे. त्यांनी कन्नडमधील अभिजात, आधुनिक आणि पुरोगामी साहित्य आणि साहित्यिकांचा उभ्या महाराष्ट्राला परिचय करून दिला, तो आपल्या दर्जेदार अनुवाद शैलीने. म्हणजे भाषिक अस्मितेचा लढा लढत असतानाही आपल्याला भाषासमृद्धीच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्याची मोठी संधी येथे उपलब्ध आहे. विशेष म्हणजे कन्नड आणि मराठी भाषांचे अनेक जाणकार या विभागात आहेत, त्यांनी असा पूल व्हायला हवे.
आज इंग्रजी भाषा समृद्ध आहे आणि वर्षागणिक होते आहे, याचे कारण म्हणजे दरवर्षी जागतिक भाषांतील हजारो शब्द ही भाषा आपलेसे करते. मराठीतले चपाती, कढी यांसारखे अनेक शब्द तिने सहजगत्या सामावून घेतले आहेत. हिंदी भाषाही अशीच लवचिक आहे. आपण मात्र मराठीचा अभिमान मिरविता मिरविता इतके दुराभिमानी बनून जातो की, इतर भाषांनाच नाकारू लागतो. हे भाषेची वृद्धी, समृद्धी आणि अस्तित्व या घटकांसाठी मारक आहे. नकारात्मकतेपेक्षा भाषिक स्वीकारार्हता, देशातील अन्य भाषांचा सन्मान आणि भारतीय भाषांचा अभिमान ही भाषा उंचावण्याची आणि देशाची अखंडता टिकविण्याची महत्त्वाची साधने आहेत. कन्नड भाषा नाकारण्याचे कारण नाही. तिचा राजकीय लाभासाठी गैरवापर केला जात असेल, तर ते निषेधार्हच आहे. तो निषेधही नोंदवायलाच हवा. मात्र, मराठी-कन्नड भाषाव्यवहार वाढायला हवा. त्यातून अंतिमतः मराठी भाषा आणि साहित्यच समृद्ध होईल, याची खात्री बाळगा.
मुळात साहित्याचे प्रयोजनच माणुसकीला आवाहन करण्याचे आहे. जे साहित्य माणसातील संवेदनशीलता जागृत ठेवत नाही, त्याला साहित्य म्हणावे कसे? साहित्याने मानवी मूल्यांचा आग्रह धरला पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी आग्रही राहिले पाहिजे. यासाठी जे साहित्य काम करते, तेच चिरंतन राहते. अशा साहित्याच्या प्रेरणा घेऊन शोषित, वंचित यांना त्यांचे व्यवस्थेतील स्थान मिळवून देण्यासाठी साहित्याने काम केले पाहिजे. व्यवस्था त्यात कमी पडत असेल, तर त्या व्यवस्थेतील त्रुटींचे निर्देशन करायला हवे. व्यवस्था राबविणाऱ्या हातांना त्यासाठी प्रेरित करायला हवे. आणि त्याचबरोबर या वंचितांमध्येही स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतविले पाहिजे. कोणत्याही साहित्याची आणि साहित्यिकाची ही मूलभूत जबाबदारी आहे, असे मला वाटते. त्या दृष्टीने निपाणी येथील मराठी साहित्य संमेलनाने दिग्दर्शकीय भूमिका पार पाडण्याची गरज आहे. नुकत्याच झालेल्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कर्नाटक सीमाभागातील मराठी गावांच्या विकासाला अग्रक्रम देण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आला आहे. तो ठरावाच्या रुपातच राहणार आहे. तथापि, या विकासाचा कृतीशील आराखडा राज्यकर्त्यांना देण्याचे काम निपाणीच्या साहित्य संमेलनाने करण्याचे कार्य करावे. त्या दृष्टीने विभागातील मराठी साहित्यिकांमध्ये आत्मविश्वास व चैतन्य निर्माण करण्यात हे संमेलन निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास वाटतो.